शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाल्लेल्यांना ‘निशान-ए-पाकिस्तान’ द्या : पवन खेरा   

नवी दिल्ली : पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांची हत्या करून फरार झालेल्या चार दहशतवाद्यांचे काय झाले? नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खाऊन आलेल्यांना निशान-ए-पाकिस्तान मिळाला पाहिजे, असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
 
भारत आणि पाकिस्तान मधील संघर्षविरामानंतर, आता भारताच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. एकीकडे राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर गंभीर आरोप करत, या संघर्षात भारताने किती राफेल विमाने गमावली असा सवाल केला होता. त्यानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर एक व्यंगचित्र शेअर करून राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्याला आता काँग्रेसकडूनही तिखट प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अमित मालवीय यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले, गंभीर वातावरणामध्ये सत्ताधारी पक्षाकडून कार्टूनगिरी सुरू आहे. 

Related Articles